पुणे : कसब्याची निवडणूक जिंकायचीच -चंद्रकांत पाटील

0

पुणे, 18 फेब्रुवारी  : कसब्याची निवडणूक ही आपल्यासाठी प्रतिष्ठेची असल्याने ती जिंकायचीच आहे, विधानसभेत कायदे केले जातात, राज्यात भाजप शिवसेनेची सत्ता असल्याने तेथे भाजपचाच आमदार गेला पाहिजे – चंद्रकांत पाटील.

शेवटच्या दोन दिवसात काँग्रेस तुमच्या कडे ‘गांधी’ घेऊन प्रचारात येतील आणि त्याला तुम्ही नाही म्हणत भाजपलाच मतदान करा, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

#कसबा #byelection2023 निमित्त भाजपा महायुतीचे उमेदवार @HemantNRasane यांच्या प्राचारार्थ रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाचा विजय संकल्प मेळावा संपन्न झाला. निवडणुकीत @BJP4Maharashtra ला प्रचंड मतांनी विजयी करण्याचा निर्धार या वेळी सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

हे ही वाचा : कंगना राणौत यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला

हे ही वाचा : आयपीएलच्या 16 व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर

भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ लोकजनशक्ती पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी पाटील बोलत होते. लोकजनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष संजय अल्हाट, सरचिटणीस अमर पुणेकर, के. टी. पवार, प्रवक्ते संदीप खर्डेकर आदी उपस्थित होते.

कसब्याची निवडणूक ही आपल्यासाठी प्रतिष्ठेची असल्याने ती जिंकायचीच आहे, विधानसभेत कायदे केले जातात, राज्यात भाजप शिवसेनेची सत्ता असल्याने तेथे भाजपचाच आमदार गेला पाहिजे – चंद्रकांत पाटील.

पाटील म्हणाले, कसब्याची निवडणूक ही भाजप विरुद्ध काँग्रेस अशी होत आहे. म्हणून यामध्ये रासने यांना निवडून द्यायचे असल्याने आजचा मेळावा आहे.

मोदी हे गरिबीत जगले आहेत, पण गांधी कुटुंब सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, श्रीमंतीमध्ये जगले आहेत. मोदी तुमच्या आमच्या सामान्य आहेत.

म्हणून मोदींमुळे आपण कोरोना काळात आपण जिवंत राहिलो आहोत. त्यांनी मोठ्या प्रमाणात लसीकरण केल आणि अनेक देशांना लस पुरवलीही.

About Author

error: Content is protected !!

Maintain by Designwell Infotech