गुलाबचंद कटारिया हे आसामचे ३१ वे राज्यपाल बनले

0

गुवाहाटी, 22 फेब्रुवारी :  गुलाबचंद कटारिया यांनी बुधवारी आसामचे ३१ वे राज्यपाल म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.

गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती संदीप मेहता यांनी गुवाहाटी येथील श्रीमंत शंकरदेव कलाक्षेत्र, पंजाबी येथील सभागृहात आयोजित एका संक्षिप्त समारंभात आसामचे 31 वे राज्यपाल म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

राज्यपाल गुलाबचंद कटारिया हे राजस्थानमधील उदयपूरचे रहिवासी आहेत. राज्यपालपदी नियुक्तीपूर्वी त्यांनी राजस्थानचे गृहमंत्री आणि राजस्थान विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून काम केले होते.

About Author

error: Content is protected !!

Maintain by Designwell Infotech